आंघोळ करताना चुकूनही करू नका या 5 चुका… आयुष्य बरबाद होईल…

नमस्कार मित्रांनो,

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज अंघोळ करणे खूप महत्त्वाचे आहे. दररोज अंघोळ केल्याने शरीराची चपळता आणि स्वच्छता देखील होते. दररोज अंघोळ करणे अनेक प्रकारच्या आजारांपासून आपल्याला दूर ठेवण्याचे काम करते. तथापि, बरेच लोक अंघोळ करताना या 5 चुका करतात, त्यामुळे आरोग्यास,आर्थिक समस्याही निर्माण होतात.

मित्रांनो या चुकांमुळे बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते. याशिवाय या चुकांमुळे आपल्याला  अनेक कामात अपयश येऊ शकतं. तसेच  बऱ्याच जणांकडे पैसा येता येता थांबत असतो आणि घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहत नाही. यासह अनेक समस्या निर्माण होत असतात. कारण ज्योतिष शास्त्रानुसार, आपण आंघोळ करताना चंद्र, राहु आणि केतु या तीन ग्रहांचा आपल्याशी थेट संबंध येत असतो.

मित्रांनो यामध्ये प्रामुख्याने जर राहू आणि केतू यांचा दोष निर्माण झाला तर, अशा व्यक्तीच्या जीवनात अनेक मोठ्या समस्या निर्माण होत असतात. यामध्ये पहिली चुक म्हणजे अंघोळ करताना कधीही आपण नखे कापू नयेत, जर नखे कापायची असतील तर, ती आंघोळीआधी किंवा अंघोळीनंतर कापावीत. पण चुकुनही  आंघोळ करताना बाथरूम मध्ये असताना कधी आपण नखे कापू नये.

दुसरी चूक ही बहुतांशी लोक करत असतात, ती म्हणजे  अंघोळ करताना केस कापणे. आंघोळ करताना बऱ्याच पुरुषांना दाढी करायची सवय असते. पण अशावेळी  केस कापल्याने राहूचा दोष निर्माण होण्याची शक्यता असते.

मित्रांनो वास्तूशास्त्रनुसार आंघोळ करताना तिसरी चूक म्हणजे, आपण अंघोळ करण्यासाठी जी बादली आणि मग वापरतो हा नेहमी स्वतःच्या पैशाने खरेदी केलेला पाहिजे. आपल्याला बादली आणि मग भेट म्हणून मिळाला असेल तर अशी बादली आणि मग आंघोळीसाठी वापरू नये. कारण त्यामुळे घरातील धनाची प्रचंड प्रमाणात हानी होत असते.

याशिवाय आपण अंघोळ झाल्यावर वापरला जाणारा टॉवेल सुद्धा, स्वतःच्या पैशांनी खरेदी केलेला असावा. असे शास्त्रांत संगितले आहे. तसेच पुढची गोष्ट म्हणजे, अंघोळ करताना आपला संपर्क हा पाण्याशी असल्याने, आंघोळ करून झाल्यानंतर आपण लगेचच अग्नीच्या संपर्कात जाऊ नये. त्याने आपल्याला दारिद्र्य येऊ शकते. ही गोष्ट विशेष करून महिलांनी पाळली पाहिजे. त्यामुळे आंघोळ झाल्यानंतर किमान 10 ते 15 मिनिटे त्यांनी इतर कार्ये करावीत. कारण अग्नी आणि जलाच्या संपर्काजवळ ग्रह दोष निर्माण होतो.

मित्रांनो याशिवाय शेवटची गोष्ट म्हणजे आंघोळ करताना आपण वाईट विचार करू नये. कारण आपण आंघोळ करताना आपल्या शरीराबरोबर मनाचीही शुद्धी होणे आवश्यक आहे. कारण स्ना न करताना, जर आपल्या मनामध्ये एखाद्याबद्दल वाईट विचार येत असेल तर त्याचा उलट वाईट विचार आपल्यावर होत असतो.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले हॅशटॅग मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा हॅशटॅग मराठी पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *